रिसोड तालुका | २६ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि वाढते शेतकरी संकट ही केवळ आकडेवारी नसून हजारो कुटुंबांच्या वेदनांची कहाणी आहे. रिसोड तालुक्यातील भोकरखेड येथे अल्पभूधारक शेतकरी नामदेव शंकर रंजवे यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून बाहेर पडता न आल्याने आत्महत्या केली. मात्र दोन वर्षांनंतरही त्यांच्या कुटुंबाला शासनाची नुकसान भरपाई मिळालेली नाही.
विधवा शशीकला नामदेव रंजवे यांनी मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही महसूल विभागाकडून वारंवार नवीन कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपासून त्या तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
श्रावणबाळ योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि अन्य शासकीय मदतीसाठी अर्ज करूनही लाभ नाकारण्यात आल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.
गत सोमवारी त्यांनी तहसील कार्यालयात आपली व्यथा मांडताना हृदयद्रावक प्रश्न उपस्थित केला — “माझ्या पतीने मरण पत्करले, आता आम्हालाही जगण्याचा अधिकार नाही का?”
या घटनेला दोन वर्षे पूर्ण होत असतानाही मदत न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाची फरफट सुरू राहत असेल तर ही यंत्रणा नेमकी कुणासाठी आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महसूल प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या विधवा महिलेच्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि प्रलंबित मदत मंजूर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
📌 संबंधित बातम्या
- रिसोड-साखरा रस्त्याच्या खड्ड्यांविरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांचा इशारा
- ऑपरेशन मुस्कान : रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ अपहरण प्रकरणांचा छडा, हरवलेले चेहरे पुन्हा हसले
- पीक विमा आणि नुकसान भरपाई प्रक्रियेतील अडथळे उघड
📢 तुमचे मत महत्त्वाचे
शेतकऱ्यांच्या कुटुंबांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रशासनाने काय करावे? तुमचे मत आम्हाला जरूर कळवा.
👉 अधिक स्थानिक बातम्यांसाठी भेट द्या: Kattanews.in














