हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

“पिकविमा रखडला तर थेट ताबा!” संभाजी ब्रिगेडचा बुलढाण्यात मोठा इशारा

Follow Us:
बुलढाणा पिक विमा आंदोलन संभाजी ब्रिगेड शेतकरी संताप

बुलढाणा | प्रा.दिलीप‌ नाईकवाड

जिल्ह्यातील हजारो शेतकरी आजही पिकविम्याच्या पैशांची वाट पाहत असताना संतापाचा उद्रेक झाला आहे. 2023-24 खरीप व रब्बी हंगामासह 2024-25 रब्बी हंगामातील कांदा पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले, मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही विमा मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत मोठा इशारा दिला आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारींची संपूर्ण यादी आणि वितरित विम्याची माहिती मागवली. वारंवार विचारणा करूनही विमा कंपनीकडून टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.विशेष म्हणजे, 2024-25 रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. कंपनीकडून सर्वेक्षण होऊनही अद्याप पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

पांडुरंग पाटील यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “लवकरात लवकर विमा रक्कम न मिळाल्यास जिल्हाभरातील सर्व विमा कार्यालये शेतकऱ्यांसह ताब्यात घेण्यात येतील.” या वक्तव्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

याआधी देखील प्रलंबित मागण्यांसाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही प्रश्न सुटले नसल्याने यावेळी आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत देण्यात आले.

दरम्यान, येत्या पालकमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यात हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आगामी काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

या आंदोलनात वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष गोपाल गरड, राहुल मेहत्रे तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या Kattanews.in ला भेट देत रहा.

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment