हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मुंबई आंदोलनस्थळी आमदार श्वेताताई महाले पाटील; संगणक परिचालकांच्या प्रश्नांवर दिले मोठे आश्वासन

On: February 25, 2026 1:05 PM
Follow Us:
Gram Panchayat computer operators protest in Mumbai

मुंबई | प्रतिनिधी |२५ फेब्रुवारी २०२६

मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांच्या आंदोलनाला 24 फेब्रुवारी रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या समजून घेत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कार्यरत हजारो संगणक परिचालक नागरिकांना शासकीय ऑनलाइन व ऑफलाइन सेवा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मात्र मानधन वाढ, सेवा सुरक्षा, कायमस्वरूपी कर्मचारी दर्जा यांसारख्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या आंदोलनात राज्यभरातून तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक संगणक परिचालक सहभागी झाले असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आमदार महाले पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि न्याय्य मागण्या शासन स्तरावर मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संगणक परिचालकांना न्याय देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनातील पदाधिकारी व संगणक परिचालकांनी त्यांचे आभार मानत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.


📢 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी

दररोज अपडेट राहण्यासाठी Kattanews.in ला भेट द्या आणि स्थानिक बातम्या सर्वप्रथम वाचा.


🔎 संबंधित बातम्या

 

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment