साखरखेर्डा,बुलढाणा |१२ फेब्रुवारी २०२६
६० किमी प्रवासाचा त्रास संपणार?
साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे अंतर तब्बल ६० किलोमीटर आहे. अपुऱ्या वाहतूक सुविधेमुळे नागरिकांना तहसील कार्यालयीन कामांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. शेतकरी, विद्यार्थी आणि ग्राहक सेवा केंद्र चालकांना वारंवार येरझारा माराव्या लागत होत्या. नव्या अप्पर तहसीलदार कार्यालयामुळे हा प्रशासकीय भार कमी होणार आहे.
भाजपा सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा व तालुक्यापासून दूर असलेल्या भागात अप्पर कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार साखरखेर्डा, शेंदुर्जन आणि मलकापूर पांग्रा या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
आंदोलनाची फलश्रुती की पहिला टप्पा?
साखरखेर्डा तालुका निर्मितीसाठी तत्कालीन आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. अनेकांनी उपोषणही केले होते.
“आमची मागणी तालुका निर्मितीचीच होती. अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर होणे ही आंदोलनाची फलश्रुती आहे, परंतु आम्ही तालुका मागणी कायम ठेवणार आहोत.”
– रामभाऊ जाधव, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
लोकसंख्या आणि भौगोलिक गरज
साखरखेर्डा गावाची लोकसंख्या सुमारे २५ हजार असून ८५ गावे २० किलोमीटरच्या परिसरात आहेत. नगर पंचायत आणि पूर्ण तहसील कार्यालय मंजूर करून स्वतंत्र तालुका घोषित करण्याची मागणी अद्याप कायम आहे.
“शासनाने विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पुढील काळात तालुका निर्मितीची मागणीही पूर्ण होईल.”
– उल्हास देशपांडे, भाजपा प्रदेश सदस्य
Related News
- भरधाव ट्रकची कारला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
- Syngenta नावाखाली बनावट कीटकनाशकांची विक्री; लोणारमध्ये मोठा प्रकार
- तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेसाठी शिक्षक पतसंस्थेची मदत
📢 आपल्या भागातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. व Follow करा.










