मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी करणखेड शिवारात तक्रारदार शेतकरी स्वतःच्या शेतातील बाभळीचे सरपण ट्रॅक्टर (एमएच २८-डी १३६६) मध्ये भरत असताना वनरक्षकांनी कारवाई केली. शासन निर्णयानुसार बाभळीच्या लाकडासाठी वाहतूक परवान्याची आवश्यकता नसतानाही ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित वनरक्षकांनी जेलमध्ये टाकण्याची धमकी देत ट्रॅक्टर बुलढाणा येथील कार्यालयात जमा केला. यानंतर ट्रॅक्टर सोडवण्यासाठी वारंवार विनंती करूनही दखल घेण्यात आली नाही.
दरम्यान, “जर कुणाकडे तक्रार केली तर ट्रॅक्टरमध्ये सागवान टाकून गंभीर गुन्हा दाखल करू” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या शेतकऱ्याने शेवटी ट्रॅक्टर सोडवण्यासाठी २० हजार रुपये अधिकाऱ्यांना आणि ५ हजार रुपये वनरक्षकाला दिल्यानंतरच ट्रॅक्टर सोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर तब्बल २२ दिवस डेपोमध्ये अडवून ठेवण्यात आल्याने शेतातील गहू पिकाचे मोठे नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी रवी तोडकर यांनी वनविभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या तक्रारीच्या प्रतिलिपी वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पाठवण्यात आल्या आहेत.
जर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई केली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
👉 Related News
- बुलढाण्यात बोगस प्रमाणपत्र घोटाळा; १५ कर्मचारी निलंबित
- शिवजयंती मिरवणुकीत राडा; पोलिसांची कारवाई
- धक्कादायक! राजेगावमध्ये शेतातून 1.43 लाखांचे पाळीव प्राणी चोरी; शेतकऱ्यांमध्ये भीती
📢 हे आवश्यक करा
अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि धडाकेबाज स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत राहा. आपल्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.










