हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

डोळ्यांसमोर उभे पीक, पण हातात काहीच नाही; शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरविला नांगर!

On: September 5, 2026 5:06 PM
Follow Us:
साखरखेर्ड्यात उभ्या सोयाबीन पिकावर नांगर फिरविणारे शेतकरी शालिग्राम नामदेव गवई
साखरखेर्डा | समाधान सरकटे 

पेरणीपासून मशागत, बियाणे आणि खतावर खर्च करून उभे केलेले सोयाबीन पीक अपेक्षेप्रमाणे वाढले नाही. तुरळक उगवलेल्या झाडांनाही फुले आणि शेंगा न लागल्याने साखरखेर्डा येथील शेतकरी शालिग्राम नामदेव गवई यांच्यावर अखेर उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली. उत्पादनाची आशा मावळल्याने त्यांनी पीक नष्ट केले. या घटनेमुळे बियाण्याची गुणवत्ता, पिकाची उगवण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गवई यांची गट क्रमांक ४७ मध्ये ६७ आर शेती आहे. या क्षेत्रात त्यांनी अंकुर कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित उगवण झाली नाही. तुरळक उगवलेल्या सोयाबीनच्या झाडांनाही फुले आणि शेंगा लागल्या नसल्याचे गवई यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादनाची शक्यता मावळल्याने त्यांनी अखेर उभ्या पिकावर नांगर फिरविला.

पेरणीपूर्व मशागत, बियाणे आणि खतासाठी केलेला खर्च यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे गवई यांनी सांगितले. संबंधित बियाण्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी आक्षेप नोंदविला असून, पिकाचा पंचनामा करून बियाण्याची अधिकृत तपासणी करावी व संबंधित कंपनीविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

परिसरातील अन्य काही शेतकऱ्यांनाही अशाच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तुमच्या गावातील बातमी आम्हाला पाठवा!

शेतकरी समस्या, स्थानिक घटना किंवा महत्त्वाची माहिती असल्यास KattaNews शी संपर्क साधा. तुमची बातमी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

WhatsApp ग्रुप जॉईन करा

संबंधित बातम्या

टीप : बियाण्याच्या गुणवत्तेबाबतचा आरोप हा शेतकऱ्याचा दावा आहे. अधिकृत तपासणीचा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघाताचे प्रतिनिधिक छायाचित

लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींची धडक; चार तरुण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

गणेशोत्सवातील डीजे बंदीवर सवाल उपस्थित करताना आमदार श्वेता महाले

गणेशोत्सवातच डीजे बंदी का? श्वेता महाले यांचा प्रशासनाला थेट सवाल; म्हणाल्या, ‘बंदी तर सरसकट घाला!’

ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

२५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा मोठा सन्मान; ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार

स्कूल बसच्या सुरक्षेसाठी नवीन नियमावली आणि तीन महिन्यांची मुदत

स्कूल बसच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; शाळांना ३ महिन्यांची मुदत, नियम न पाळल्यास परवाना रद्द

माळवंडीतील शेतरस्ता अडवल्याप्रकरणी गणेश आमले यांचे निवेदन

शेतरस्ता अडवल्याने शेतकऱ्याची न्यायासाठी महसूलमंत्र्यांकडे धाव; विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही निवेदन

शेगावमध्ये महालक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी आलेले व्यावसायिक विकास वाणी यांचा खामगावात मृत्यू

शेगावमध्ये महालक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी आलेल्या व्यावसायिकाचा खामगावात मृत्यू; नातेवाईकांची खुनाच्या चौकशीची मागणी

Leave a Comment