बुलढाणा | २९ मार्च २०२६
वामन यंगड मृत्यू प्रकरणात अखेर 10 दिवसांनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे माळवंडी परिसरात मोठा संताप उसळला होता.
घटनेनंतर अनेक दिवस पोलिसांकडून ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत होता. आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचे आरोपही करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. अखेर या दबावानंतर पोलिसांनी 27 मार्च रोजी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून उशिरा का होईना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
Related News










