मुंबई |कट्टा न्यूज नेटवर्क
अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. CDR मध्ये थेट मंत्र्यांचे कॉल उघड झाल्याचा दावा होत असून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, खरातच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) मध्ये राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचे कॉल समोर आले आहेत. या धक्कादायक खुलाशामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या CDR मध्ये सर्वाधिक संपर्क रूपाली चाकणकर यांनी साधल्याचे सांगितले जात आहे. चाकणकर आणि खरात यांच्यात तब्बल ३३ हजार ७२७ सेकंद म्हणजेच सुमारे साडेनऊ तास संभाषण झाल्याचेही समोर आले आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनही वारंवार कॉल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, अशोक खरातसाठी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये कायमस्वरूपी सूट बुक असल्याची माहितीही समोर आली आहे. याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे व्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि हवाला रॅकेटचा अँगल अधिक गडद होत असल्याचे बोलले जात आहे.
खरातच्या कुटुंबातील सदस्यानेही ‘घरात मोठ्या प्रमाणावर पैसे असायचे’ असा दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हे पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर होत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व घडामोडींमुळे तपास यंत्रणांची हालचाल वाढली असून पुढील चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
या दाव्यांबाबत संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.अशोक खरात CDR प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.
Related News










