हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देऊळगाव राजा मध्ये बनावट पोलिसांनी केली फसवणूक, शेतकऱ्याची नऊ ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास

On: April 5, 2026 11:31 AM
Follow Us:
देऊळगाव राजा येथे बनावट पोलिसांकडून शेतकऱ्याची सोन्याची अंगठी फसवणूक
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

देऊळगाव राजा |५ एप्रिल २०२६

देऊळगाव राजा येथे बनावट पोलिस बनून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘आम्ही पोलिस आहोत’ असे सांगत दोन अनोळखी व्यक्तींनी शेतकऱ्याची ९ ग्रॅम सोन्याची अंगठी काढून नकली अंगठी देत पसार झाल्याची घटना २ एप्रिल रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

काशीनाथ त्र्यंबक डोईफोडे (वय ५५, रा. डोलखेडा खुर्द, ता. जाफराबाद, जि. जालना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून स्वतःला पोलिस असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. तपासणीच्या बहाण्याने त्यांनी त्यांच्या हातातील अंदाजे २७ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली.

काही क्षणांतच आरोपींनी मूळ अंगठीऐवजी नकली अंगठी देत घटनास्थळावरून पळ काढला. प्रकार लक्षात येताच डोईफोडे यांनी तातडीने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१९(२), २०४ व ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल समाधान गीते या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, शहरात बनावट पोलिस बनून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.


👉 Related News


📢 Call To Action: अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा. ही बातमी शेअर करून इतरांनाही सतर्क करा.

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment